भारतात 2014 साली डिजिटल इंडिया आणि स्टार्टअप इंडिया च्या माध्यमातुन शेती मधे अनेक नविन चेहरे या संदर्भातील कंपन्या घेवुन आलेत.
भारतात आलेले वेदर स्टेशन हे त्या आधी नव्हते अशातला भाग नाही, आमच्या कॉलेज मधे देखिल वेदर स्टेशन होते, आणि ते त्याकाळी एटोमॅटिक नसल्याने ज्या काही नोंदी व्हायच्या त्या हाताने कागदावर लिहाव्या लागत होत्या.
एटोमॅटिक वेदर स्टेशन आल्यानंतर त्यात एक परिपुर्ण पॅकेज घेवुन आले. मातीच्या पाण्याचा सेंसर त्यात असल्या कारणाने, ते एकाच पिकासाठी काम करते असा पक्का समज झाला. भगवत गीतेत श्रीकृष्ण सांगतात तसे, मोठ्यांचे अनुकरण इतर करतात. तसा तो नंतर प्रसार होत गेला की, वेदर स्टेशन हे त्या पिकाच्या शेतात लावले नसेल तर ते इतर पिकांसाठी काम करत नाही. वास्तविक पाण्याचा सेंसर असल्याने ती मर्यादा त्याला आली, मर्यादा हे वेैशिष्ट्य कसे बनले हे सांगणे कठिण आहे.
जगभरातील विविध संशोधन संस्था, शास्रज्ञ यांचा अभ्यास केला तर लक्षात येते की, टोपोग्रॉफी मधे फार मोठे बदल नसतील तर वातावरण फार बदलत नाही. अनेक देशात तर रोग व किडिंच्या बाबत पुर्वानुमान करणारी यंत्रणा ही पुर्ण देशाच्या पातळीवर काम करते. त्यात देखिल आता सॅटेलाईट व्दारा दर तासाचे तापमान, आर्द्रता वै मोजली जाते, ज्याची रेंज अजुन छोटी होवुन ती 40 ते 80 किमी पर्यंत खाली आलेली आहे. याच तंत्रज्ञानाचा वापर करुन जगभरात शेतकरी हितासाठी काम होते आहे, ज्यात तेथील सरकारे आणि संस्था जोशात सहभाग घेत आहेत.
वास्तविक किड व रोग नियंत्रण हा भारतासारख्या प्रती व्यक्ति सरासरी 3 एकर क्षेत्र असेल तर, सर्वांनी एकाच वेळी करण्याचा विषय ठरतो. ज्यामुळे किड व रोग एका शेतातुन दुस-याच्या शेतात जाणे काही प्रमाणात का होईना कमी करता येणे शक्य होते.
पण तसे होणे शक्य नाही. लिहितांना वाईट वाटतय पण तरी देखिल आपसातील हेवेदावे तसेच कायम राखुन देखिल आपण वयैक्तिक पातळीवर शेजारच्या शेतात रोग व किड येण्याच्या आत आपल्या शेतात योग्य वेळी फवारणी घेवु शकतो.
शिवाय आपण एक शेतकरी म्हणुन दुकानदार आणि कंपनी प्रतिनिधींवर अवलंबुन असतो, जेव्हा वेळ येते निर्णय घेण्याची. अशा परिस्थितीत जर आपल्याला किड व रोगांचा एक पॅटर्न माहीत आहे तर, जसे की आपण अमावस्या हा मुहुर्त सर्वांनी एकमताने मान्य केला, पण अशा किती तरी अमावस्या गेल्यात त्या आपण पाळल्या आहेत आणि येथुन पुढे देखिल पाळत राहु. अधिक शास्रीय पर्याय आता, सॅटेलाईट व्दारा तापमान आणि आर्द्रता मोजुन आपल्या कडे आहेत.
वेदर स्टेशन हे कम्युनिटी वेदर स्टेशन असु शकते जे, शक्यतो ग्राम पंचायत, गावातील प्रतिष्ठित कृषी सेवा केंद्र चालक यासारख्या समाजात प्रभावशाली व्यक्तिंकडे ते असले तर ते शेतकरी वर्गाला अधिक चांगली आणि अधिक अचुक सेवा, वेळेवर देवु शकतील. कृषी सेवा केंद्रातील जीवघेणी स्पर्धा बघता येथुन पुढे तंत्रज्ञान आत्मसाद असेल आणि काहीतरी सिक्रेट असेल तर अशा गोष्टीतुन ते केंद्र ईतरांपेक्षा नक्कीच वेगळे ठरेल.
शेती करत असतांना, किड व रोग नियंत्रण हा विषय स्वस्त राहीलेला नाही, किड व रोग नियंत्रण करण्यात जो पैसा खर्च होतो, तो जर पिकाचे वास्तविक उत्पादन वाढते अशा खते, संजिवके, संप्रेरके, सुक्ष्म अन्नद्रव्ये यावर खर्च झाला तर पिकाचे उत्पादन नक्कीच वाढेल, मात्र एक सर्वसाधरण शेतकरी किड व रोगांच्या कचाट्यात इतका सापडतो की, अशा वेळी पिक संगोपनासाठी केला जाणारा खर्च हा गुंतवणुक न रहाता तो एक अवांतर खर्च बनुन पिकाची उत्पादन कॉस्ट वाढत जाते.
Welcome to Agriplaza. India's first and only comprehensive digital platform dedicated to agriculture and farmers. Explore widest range of related data our figures speaks a lot.
Visitors
Diseases
Pests