logo

पिकावर रासायनिक घटकांचे अवषेश कसे निर्माण होतात

पिकावर विविध रासायनिक बुरशीनाशक आणि किटकनाशक यांच्या फवारणीमुळे पिकावरिल रोग आणि किड नियंत्रणात जरी मदत होणार असली तरी देखिल, निर्यात होणा-या शेती मालात या रासायनिक अवशेषांमुळे त्या शेती मालाच्या निर्यातीवर विपरित परिणाम होत असतो.

पिकावर रासायनिक घटकांचे अवषेश कसे निर्माण होतात –

१. रोग नियंत्रणासाठी आणि किड नियंत्रणासाठी वापर केल्या जाणा-या विविध बुरशीनाशकांच्याव किटकनाशकांच्या फवारणीतुन पिकावर रासायनिक अवशेष राहतात. या मधे निर्धारित प्रमाणा पेक्षा, आणि निर्धारित संख्ये पेक्षा जास्त वेळेस फवारणी होणे, या कारणामुळे पिकावरिल रासायनिक बुरशीनाशकांचे अवशेष प्रमाणापेक्षा जास्त दिसुन येतात.

२. पिकाची अंतर्गत अशी अवशेष व्यवस्थापन यंत्रणेवर ताण पडल्याने देखिल रासायनिक घटकांचे अवशेष जास्त प्रमाणात दिसुन येतात.

३. पिकांस जमिनीतुन पाणी शोषुन घेत असतांना, जमिनीतील पाण्यातुन अशा रासायनिक घटकांची गरज नसतांना देखिल उपलब्धता होते.

पिकावरिल रासायनिक अवशेष कशा प्रकारे दुर केले जावु शकतात –

१. निर्धारित प्रमाणात आणि निर्धारित संख्ये नुसार बुरशीनाशक, किटकनाशक यांच्या फवारणी घेणे.

२. रासायनिक घटकांचे जमिनीवर होणारे आक्रमण थांबविण्यासाठी त्यांचा वापर करतांना ते फवारणीच्या पाण्यातुन जमिनीवर सांडणार नाही, उडणार नाही यासाठी योग्य अशा फवारणी यंत्राचा वापर करणे.

३. पिकाचे आरोग्य योग्य राखणे जेणे करुन फवारणीची गरज कमी पडेल.

४. रोग किंवा किड येण्याच्या आधीच जर प्रतिबंधकात्मक उपाययोजना उपलब्ध असतिल तर त्यांचा अवलंब करणे.

५. एकात्मिक किड व रोग नियंत्रणावर भर देणे.

६. उपयुक्त जीवाणूंचा वापर करुन पानांवरिल तसेच जमिनीतील रासायनिक घटकांचे अवशेष कमी करणे.

पिकाची स्वतःची अशी रासायनिक घटकांचे अवशेष दुर कऱण्याची व्यवस्था आणि वातावरणाचा परिणाम–

१. द्राक्ष पिकात विविध किटकनाशके आणि बुरशीनाशके यांचे विघटन करण्याची क्षमता आहे, या क्षमतेनुसारच विविध रासायनिक बुरशीनाशके आणि किटकनाशके यांचे पीएचआय तसेच एमआरएल पातळी काढल्या जात असतात.

२. पिकाची ज्यावेळेस वाढ होत असते, त्यावेळेस रासायनिक अवशेषांचे प्रमाण त्या तुलनेत पिकाच्या वाढीमुळे कमी होत जाते.

३. पिकाच्या पानांवर पडणा-या पाणी,दव, तसेच सुर्य प्रकाश यामुळे देखील रासायनिक घटकांचे विघटन होत असते.

४. पिकातील मेटाबोलिझम मधे देखिल रासायनिक घटकांचे विघटन होत असते.

५. या व्दारा होणारे विघटन हे अत्यंत कमी प्रमाणात आणि सावकाश असे असते.

फळांवरिल रासायनिक घटकांच्या विघटनात, सर्वात मोठी आणि महत्वाची भुमिका ही मायक्रोबॅक्स चे बॅसिलस स्पे. गटातील जीवाणू पार पाडीत असतात. मायक्रोबॅक्स च्या सटलेक्स, विटाग्रो डिप तसेच ग्रोबॅक्स ह्या उत्पादना बॅसिलस गटातील विविध जीवाणू आहेत. ज्यांच्या वापरातुन फळातील रासायनिक बुरशी नाशक तसेच किटक नाशक ह्यांचे अवशेष कमी होण्यात मदत मिळते.

जमिनीत तसेच पानांच्या वर असणारे उपयुक्त जीवाणू समुह हे रासायनिक घटकांचे विघटन करुन त्यांचा वापर कार्बन, नत्र याचा स्रोत म्हणुन करतात. या गटात बॅसिलस, सुडोमोनास यांचा मोठा सहभाग असतो.

रासायनिक घटकांचे विघटन होते म्हणजे काय होते

१. विविध बुरशीनाशके आणि किटकनाशके यांचे जे अवशेष पिकावर तसेच जमिनीत शिल्लक राहतात त्यांनाच येथे आपण एक समान शब्द म्हणुन रासायनिक घटक असे म्हणत आहोत याची नोंद घ्यावी.

२. रासायनिक घटकांचे विघटन म्हणजे जीवाणूंच्या पेशीतुन स्व्रणा-या विविध घटकांमुळे, त्या रासायनिक घटकास ज्या गुणधर्मामुळे नाशकाची (बुरशी किंवा किटक नाशक) क्षमता प्राप्त होते, ती क्षमता नष्ट केली जाते.

३. पर्यावरणास पुरक अशा घटकात रुपांतर केले जाते, या प्रक्रियेत हानीकारक क्षमता कमी होते, तसेच ते पर्यावरणास हानीकारक ठरत नाही,

४. तिसरा जो प्रकार असतो त्यात रासायनिक घटकांना पुर्णतः साध्या स्वरुपात (जसे कार्बन, मिथेन, नत्र वै. ) रुपांतर केले जाते.