Ralstonia solanacearum
कशामुळे होतो
(Ralstonia solanacearum) राल्सोटिया ह्या जीवाणू मुळे टोमॅटो, वांगी, मिरची आदी सोलेनीस परिवारातील पिकांवर मर रोगाचा प्रादुर्भाव होतो. सोलेनीस परिवारीच्या व्यतिरिक्त २०० प्रकारच्या वनस्पती आणि २० प्रकारच्या वनस्पती परिवारांच्या मुळांवर हल्ला करण्यास हा जीवाणू सक्षम आहे. ह्या रोगाच्या वाढीसाठी २६ ते ३२ डिग्री सेल्सियस तापमान पोषक ठरते. रोगाचा प्रसार हा पाण्याव्दारे तसेच मातीव्दारे होतो. हा जीवाणू अनेक दिवसांपर्यंत प्रादुर्भावग्रस्त पिकाचे अवशेष, तसेच ज्या शेतात प्रादुर्भाव झालेला आहे, त्या शेतातील पाण्यात देखिल सुप्तावस्थेत राहु शकतो.
जास्त तापमान आणि ९५ टक्क्यांपेक्षा कमी ची आर्द्रता रोगासाठी काही प्रमाणात हानीकारक ठरते. रोगाची लागण ही, मुळांच्या व्दारा, तसेच काही प्रमाणात खोडावर इजा झालेली असल्यास त्या व्दारे देखिल होते. वा-या व्दारे प्रसार होत नाही. प्रादुर्भाव ग्रस्त रोपांकडुन निरोगी रोपांनी लागण ही पाण्याव्दारे, शेतीची मशागत करण्यासाठी केल्या गेलेल्या कामांमुळे देखिल होते.